Monday, March 28, 2016

दानेन पाणिर्न तु कंकणेन स्नानेन शुद्धिर्न तु चंदनेन।
मानेन तृप्तिर्र भोजनेन ज्ञानेन मुक्तिर्न तु मण्डनेन।।
हाथो की शोभा दान से होती है,कंगन पहननेसे नही।
शरीर की शुद्धि स्नान से होती है,चंदन से नही।
मानसिक तृप्ति आदर सन्मानसे होती है,भोजन से नही।
ज्ञान से मुक्ति होती है,तिलक छापे लगाकर नही।


 संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर 'आपण याने निष्पाप होऊ' अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे ! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घ्यावे" श्री राम समर्थ

अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥
आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥
देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥
देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥
हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥
साँच बीना सुमिरण नहीं,
बीन भेद न भक्ति होय।
पारस में पडदा रहा,
कैसे लोहा कंचन होय?
(पारसका मतलब जिसके स्पर्श से लोहा भी सोना हो जाता है। कंचन का मतलब सोना/Gold)


संत कबीर - भगवान तुम्हारे अंदर है… बाहर नही।
ज्यों नैनो में पुतली(Eye Ball), त्यों मालिक घर माही।
मूरख लोग न जानिए, बाहर ढूँढत जाय॥
जैसे तिल में तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साईं तुझ में है, तू जाग सके तो जाग॥
कबीरा ज्ञान बिचार बिन, हरी ढूंढन को जाय।
तन में त्रिलोकी बसे, अब तक परखा नाय॥
निर्बुद्ध को सुझे नही, उठी उठी देवल जाय।
दिल देहरा(शरीर) की खबर नही, पाथर के पीछे जाय॥
तेरे हृदय मे हरी है, ताको न देखा जाय।
ताको जब देखिये, दिल की दुविधा जाय॥
शीतल शब्द उचारिये, अहम मानीये नाही।
तेरा प्रीतम तुझ में है, दुश्मन भी तुझ माही॥
तेरा साई तुझमे जो, बचपन मे है वास।
कस्तुरी का हिरण जो, फिर फिर ढूँढे घास


संत कबीर के गर्व, अहंकार के बारे मे दोहे
मै मै बडी बलाई है, सके तो निकले भाग।
कहे कबीर कब लग रहे, रुई लपेटी आग।।
आखिर ये तन खाक मिलेगा, काहे फिरत मगरुरी मे।
कहत कबीरा सुनो भाई साधो, साहीब मिले सबुरी मे।।
मान बढाई जगत मे, कुत्ते की पहचान।
प्यार कीया मुख चाटे, बैर कीया फाडे खाय॥
ध्यानी, ज्ञानी, दाता घने। रथी, महारथी मिले अनेक।
कहे कबीर मान(अहंकार) विरहीत, लाखो में एक॥
कबीर कहे गर्वियो, काल पकडी रखा है केस(चोटी/शरीर)
ना जाने कहाँ मरसी, घर या परदेस॥
उंचा पानी ना टिके, नीचे ही ठहराये।
नीचा होय तो भारी पिये, उंचा प्यासा रहे जाये॥
(उंचा पानी का मतलब है अहंकार और गर्व)
माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय।
एक दिन ऐसा आयेगा, मैं रौंदूंगी तोय॥
कबीरा गर्व ना किजीये, कबहूं हंसीये ना कोय।
तेरी ये नाव समुद्र में, ना जाने कब क्या होय॥
धन जाये तो क्या हुआ, मान ना जल्दी जाय।
मान बडे मुनिवर गये, मान सबन को खाय॥
मान बढाई ना करे, बडे ना बोले बोल।
हीरा मुख से ना कहे, लाख हमारा मोल॥
कबीर गर्व न किजीये, चाम(चमडी) लपेटी हाड़।
एक दिन तेरा छत्र सिर, देगा काल उखाड़॥
राज पाट धन पायके, क्यों करता अभिमान।
पड़ोसी की जो दशा, भई सो अपनी जान॥
अहं(अहंकार) जाके हृदय में, ज्ञान मिले सबूरी में॥
कहाँ फिरत मग़रूरी में।आखिर तन मिलेगा खाक में।
कबीर गर्व न किजीये, ऊँचा देखि आवास(घर)।
काल पडे भुंइ(धरती) लेटना, ऊपर जमसी घास॥
काल फिरे सिर ऊपरे, हाथों धरी कमान।
कहे कबीर गहु ज्ञान को, छोड़ सकल अभिमान॥
बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर।
पंछी को छाया नही, फल लागे अति दूर॥
पाकि खेती देखकर, गर्व किया किसान।
अभी झोला(संकट) बहुत है, घर आवे तब जान॥
लकडी कहे लोहार से, तू क्या जाले मोय।
एक दिन ऐसा आयेगा, मैं जलाउंगी तोय॥
मन अभिमान न कीजीये, कहे कबीर समझाये।
जो सिर अहं (अहंकार) संचरे, पडे चौरासी जाय॥
जहां आपा(अहंकार) तहां आपदा, जहां संकट तहां शोक।
कहे कबीर कैसे मिटे, चारो दीर्घ रोग॥
(चार रोग - 1)अहंकार 2)आपदा 3)संकट 4)शोक)
आपा(अहंकार) मिटा हरि मिले, हरि मिटा सब जाय।
जब मैं(अहं) था तब हरी नहीं, अब हरी हैं मैं(अहं) नहीं।
सब अंधियारा मिट गया, जब दीपक देखा मन माही॥
देवी बडी न देवता,
सूरज बडा न चाँद।
आदी अंत दोनों बड़े,
कहे गुरु के गोविंद।।
अर्थ - इस दुनिया में देवी, देवता, सूरज और चाँद बडे नहीं है। सबसे बडा आदि और अंत है। आदी(starting point) का मतलब ये धरती का निर्माण जब हुवा वो समय और अंत(End point) का मतलब ये धरती जब नष्ट होगी वो समय। दुनिया की सारी चीजो से आदी और अंत बड़े है।
पंडीत छोड़ो पाथरा(पाथर का देव),
काजी छोड़ो कुराण।
वहः तारीख़ बताई दे,
थे न जमीन आसमांन।
अर्थ - पंडीत और काजी से कबीर साहब ने इस धरतीका(जमीन और आसमांन) निर्माण कब हुवा इसकी तारीख(date) पूँछी है। धर्म के नाम पर भेदभाव करने वालो को कबीर साहब स्पष्ट रूप कहते है की ये भेदभाव मानव निर्मित है।

Sunday, March 27, 2016

भगवंताची स्मृति आणि कर्तव्याची जागृति.
प्रत्येक मनुष्य बोलताना 'मी' आणि 'माझे' अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. 'माझे' या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात 'मी' चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीति यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. 'कर्तव्य' याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने 'मी' आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. 'मी' चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, 'मी' चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नति करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आतबाहेर गोड असावे. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.
-------------------------------
८८. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.
प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत ।
कुळीं उगवत भाग्ययोगें ॥
तें रूप पंढरी उभें असे सानें ।
त्रिभुवनध्यान वेधियेले ॥
उगवली ज्योति प्रभा पैं फाकती ।
नाहीं दीनराती पंढरीये ॥
प्रभात हरपे सायंकाळ लोपे ।
दिननिशी लोपे विठ्ठलप्रभा ॥
पृथ्वी हे ढिसाळ वायु व्योमफळ ।
सेविती अढळ जोडती रया ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ ।
पंढरी ये राम विश्रामले ॥

तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥

पक्षी अंगणी उतरती |
ते का गुंतोनी राहती ||
तैसे असावे संसारी |
जोवरी प्राचीन्नाची दोरी ||
वस्तीकर वस्ती आला |
प्रातःकाळी उठोनी गेला ||
एकाजनार्दनी शरण |
ऐसे असता भय कवण ||
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती।
रत्नकीळ फांकती प्रभा।
अगणित लावण्य तेज:पुंजाळले।
न वर्णवे तेथेचि शोभा॥🚩
जगाला चालना देणारी मुर्तिमंत शक्ती म्हणजे
आमचा पंढरिशु पांडुरंग परमात्मा
कोणीही या आणि शुद्ध व्हा
इथ भीक मागायची गरजच नाही
शुद्धतेची गरजय
जेवढी शुद्धता आपल्यात येईल
तेवढ ज्ञान अंत:करणात
प्रकाशित होईल
प्रेमाचा प्रसाद मिळेल
ज्ञान आणि प्रेम नसल्यामुळच आपण दु:खीय
संसारात ज्ञान व ईश्वरावर प्रेम असत आणि असच पाहिजेही
पण ते कायम उलट करतात
संसारात प्रेम ठेवतात व
ईश्वराला ज्ञानाने पाहण्याचा
प्रयत्न करतात
आईच्या उदरातील गर्भाला ज्याप्रमाणे आईच्या वयाचं
ज्ञान नसतं
त्याचप्रमाणे आमच्या पांडुरंगाचही आहे
त्याच प्रेम मिळालं तर ते
तृप्त करून जिवाला पुर्ण करतं
सर्वशक्तीचा साक्षात्कार होतो
चैतन्यमय सृष्टी होते
जीव आनंदान न्हाऊन निघतो
नाद विठ्ठल विठ्ठल
ऊठे रोमारोमातुन..
जय मुक्ताई🚩


प्रपंच रचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हरविली । वैराग्याचि निष्ठा प्रगटुनि दाखविली । अहंता ममता दवडुनी निजशांती वरिली ॥ जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा । तारक तु सकळांचा जिवलग सोयरा ॥ हरि भक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोद्धारा लागी उपाय सुचविला । निँदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकि । कोरड्याची काढुनि दाखविल्या शेखी । अपार कविताशक्ती मिरवुनि इहलोकी । किर्तन श्रवणे तुमच्या उद्धार जन लोकी ॥ बाळवेष घेऊनि श्रीहरि भेटला । विधीचा जनिता तोची आठव हा दिधला । तेणे ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला । न तुके म्हणोनि तुका नामी गौरविला ॥ प्रयाणकाळि देवे विमान पाठविले । कलिच्या काळामाजी अद्भुत वर्तविले । मानव देह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥


जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन ।
तयां संतांचें
महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
!! संत संग देई सदा !!
लागोनियां पाया विनवितो तुम्हांला ।
कर टाळीं बोला मुखें नाम ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥
सकळांसी येथें आहे अधिकार ।
कलियुगीं उद्धार हरिनामें ॥
तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति ।
ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥

रामकृष्णहरि माऊली
प्रथम तुला वंदितो कृपाळा | गजानना गणराया || धृ ||
विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तीमिर हार का, सुखकारक तू दु:ख विदारक
तूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रम्हांड नायका
विनायक प्रभुराया ..... || १ ||

सिद्धीविनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला, शेंदूर वदना विद्याधीशा
गणाधिपा वत्सला, तूच ईश्वरा साह्य करावे,
हा भव सिंधू तराया.... || २ ||
गजवदना तव रुप मनोहर
शुक्लांबर शिवसुता, चिंतामणी तू अष्टविनायक,
सकळांची देवता रिद्धी सिद्धीच्या वर दयाळा
देईकृपेची छाया.... || ३ ||

Saturday, March 26, 2016

प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे.
प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे ? सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग ? किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे ! प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे ? भगवंताचा 'साधन' म्हणून आपण उपयोग करतो, आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एकजण मारूतिरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली; तेव्हा तीही मारूतीच्या संमतीनेच झाली असे नाही का ?
'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात ! कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्‌हड्‌ करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत ! वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही; आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.
न पश्यति जन्मांध: कामान्धो नैव पश्यति।
न पश्यति मदोन्मत्तो ह्यर्थी दोषान न पश्यति।।
जन्म से अन्धे को दिखाई न देता, कामांध को भी कुछ नही दिखता,शराब आदि के कारण उन्मत्त को कुछ नहीं सुझता,और स्वार्थी अपने काम को सिद्ध करने की धुन में दोष नहीं देखता।




काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं ।
वास पंढरीचा जन्म सदा देइप । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥1॥
कृपा देइप दान हरि मज कृपा देइप दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण ।
आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥
नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं ।
संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥2॥
पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता ।
नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥3॥
नेहमी नामस्मरण केले असता सर्व काम आपोआप होते. देव साहय्य करतो. सत्यसंकल्पाचा दाता भगवान त्यामुळे आरोग्य प्राप्त होऊन आनंदच होतो. रोज तीन वेळा निष्ठेने नामस्मरण केले असता मनात संशय,विकल्प निर्माण होत नाहीत व सदगुरु देहाने दूर असले तरी संकट दूर करण्यास शिष्याच्या जवळच असतात, असा अनुभव येतो. - साधक बोध.

Athavani by P. Lalitakka
11. Shri Gurudev used to often ask Shri Pralhadrao Kulkarni the meanings of Kannada words. Once Shri Gurudev asked Shri Pralhadrao the meaning of 'Nere nambu'.He said 'believe in God properly or thoroughly ' .Shri Gurudev was not satisfied. Gurudev then asked the meaning of 'Nere Hore '.Shri Pralhadrao said neighbourhood or placed /situated at right or left. Then Shri Gurudev said, " Now I got the meaning of Nere nambu. ' further Gurudev said, " It is believing in God only after having Sakshatkar. Being beside God. Then believing in him. "
Till then no one had given the meaning of the phrase so accurately.




ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥

Let us learn to contain our ego! Let us strive to get strong to bear the consequences of the faults of the world! Let us be judicious to offer support for those who are in grief, so they can relieve of it themselves!
ಲೋಕದ ಡೊಂಕ ನೀವೇಕೆ ತಿದ್ದುವಿರಿ ?
ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ತನುವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ;
ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ.
ನೆರೆಮನೆಯ ದುಃಖಕ್ಕೆ ಅಳುವರ ಮೆಚ್ಚ
ನಮ್ಮ ಕೂಡಲಸಂಗಮದೇವ.

Why do you try to mend the failings of the world?
Strengthen (Assuage) your bodies first, each one of you!
Strengthen (Assuage) your own minds, each one of you!
Lord Kudala Sangama Deva does not approve (sympathize with) those bemoaning (weeping for) neighbor’s grief!